तांदुळवाडीतील १४ युवकांचा शौर्याचा गौरव; मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडतर्फे सत्कार
अकलूज, दि. २८ जून : मौजे तांदुळवाडी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील सातारा–पंढरपूर मार्गावरील विहिरीत १४ जून २०२६ रोजी पिकअप वाहन कोसळून भीषण दुर्घटना घडली होती
. या दुर्घटनेत श्री. रामकृष्ण बाळासाहेब कदम यांच्या वाहनासह १४ जण विहिरीत पडले. त्यापैकी ४ महिला व ४ लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला; मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून १४ धाडसी युवकांनी विहिरीत उड्या मारत ६ जणांचे प्राण वाचविले.

या शौर्यवान युवकांमध्ये इरफान रुबाब मुजावर, तानाजी शिवाजी कदम, हनुमंत जोतिराम रंदवे, संतोष सुभाष डोके, किरण संतोष दुधाट, धनाजी तानाजी कदम, तुकाराम किसन कर्णेवर, गणेश महादेव धायगुडे, दादासाहेब वैजीनाथ माने, स्वप्निल शहाजी कदम, सुजित बळी हेगडे, महादेव सतीश कदम, तानाजी सुखदेव सुर्वे आणि आप्पासाहेब तात्यासाहेब कदम (सर्व रा. तांदुळवाडी) यांचा समावेश आहे.

या सर्व युवकांच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने दि. २८ जून २०२६ रोजी तांदुळवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. इरफान रुबाब मुजावर, किरण संतोष दुधाट, दादासाहेब वैजीनाथ माने, स्वप्निल शहाजी कदम, तानाजी सुखदेव सुर्वे, आप्पासाहेब तात्यासाहेब कदम तसेच अपघातातील जखमींवर उपचार करणारे डॉ. राहुल मिले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले
.त्यानंतर उपस्थित मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि युवकांनी सामूहिक जिजाऊ वंदनेचे गायन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राहुल मिले यांनी केले.
इरफान रुबाब मुजावर यांनी दुर्घटनेच्या वेळी घडलेल्या प्रसंगाचे सविस्तर वर्णन करून बचावकार्याची माहिती दिली.
यावेळी सर्व शौर्यवान युवकांचा शाल, फेटा, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. इंजि. उत्तमराव माने, अक्काताई माने, मनोरमा लावंड, शारदा चव्हाण, राधिका शिंदे, मंगल मिले, गाथा मिले, श्रेया मिले, श्रद्धा मिले, शिवाजीराव लोंढे, बाळासाहेब पवार आणि दत्तात्रय लावंड यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात युवकांनी दुर्घटनास्थळी अद्यापही पुरेशा सुरक्षेची व्यवस्था नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित विहिरीसह परिसरातील इतर विहिरींना तातडीने संरक्षण भिंत उभारण्याची मागणी त्यांनी केली. संबंधित विभाग व ठेकेदारांनी वेळेत आवश्यक खबरदारी घेतली असती तर निष्पाप नागरिकांचे प्राण वाचले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
इंजि. उत्तमराव माने यांनी आपल्या मनोगतात या सर्व भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन देत युवकांच्या शौर्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा घोरपडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नामदेव मिले यांनी केले
.कार्यक्रमानंतर मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रहीम मुलाणी, नामदेव मिले व डॉ. राहुल मिले यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी समाधान चव्हाण, धनाजी कदम, अज्ञान लोखंडे, रुबाब मुजावर, बबन मिले, मंगल मिले, श्रद्धा मिले तसेच तांदुळवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







